img

कार्यप्रकार

कार्यप्रकार 

1.1) महामंडळाची स्थापना

गोदावरी खोऱ्यातील महाराष्ट्राच्या वाटयाला आलेले पाणी द्रुतगतीने उपयोगात आणून खोऱ्यातील पाटबंधारे प्रकल्प, लाभक्षेत्र विकास प्रकल्प, जल विद्युत व उर्जा निर्मिती योजना इत्यादींना चालना देण्यासाठी महाराष्ट्र अधिनियम क्र.23, दिनांक 17-08-1998 अन्वये महामंडळाची स्थापना झाली व दिनांक 1-10-1998 पासून प्रत्यक्ष कामकाजास सुरुवात झाली.

1.2) गोदावरी खोऱ्याची भौगोलिक माहिती

गोदावरी नदी सह्याद्रीच्या घाटातून नाशिक जिल्हयातील त्र्यंबकेश्वर येथे उगम पावते. पुढे ती अहमदनगर, छ.संभाजीनगर  नांदेड जिल्हयातून वाहत आंध्र प्रदेशात जाते व राजमहेंद्रीजवळ बंगालच्या उपसागरास मिळते. या महामंडळाच्या हद्दीमधे उगमापासून ते राज्य सीमेपर्यंत मुख्य गोदावरी नदीची लांबी 732 कि.मी. आहे. जिल्हा निहाय भौगोलिक क्षेत्र खालील प्रमाणे आहे.

(क्षेत्र : लक्ष हेक्टर)

अ.क्र.

जिल्हा

एकूणभौगोलिकक्षेत्र

गोदावरीखोऱ्यातीलक्षेत्र

अन्यखोऱ्यातीलक्षेत्र

अवर्षणप्रवणतालुके

(गोदावरीखोऱ्यातील)/ आदिवासी तालुके/एकूणतालुके/

1

2

3

4

5

6

1

औरंगाबाद

10.108

9.640 (95%)

0.468 (तापी)

(5 % )

वैजापूर,गंगापूर,कन्नड,पैठण, खुलताबाद, छ.संभाजीनगर (6)/9

2

जालना

7.718

7.718 (100 %)

--

घनसांगवी, अंबड (अंशत:) (2)/8

3

परभणी

6.515

6.515 (100%)

--

(0)/9

4

हिंगोली

4.526

4.526 (100%)

--

(0)/5

5

नांदेड

10.528

10.528 (100 )

--

(0)/किनवट/16

6

बीड

10.694

9.081 (85 %)

1.613 (कृष्णा)

(15 %)

बीड,पाटोदा,गेवराई,माजलगांव, धारुर, केज(अंशत:) (6)/11

7

लातूर

7.157

7.157 (100 %)

--

अहमदपूर, चाकूर (2)/10

8

उस्मानाबाद

7.569

3.075 (41 %)

4.494 (कृष्णा)

(59 %)

भूम (अंशत:), कळंब (अंशत:), उस्मानाबाद (अंशत:), (3)/8

9

अहमदनगर

17.048

10.878 (64%)

6.170 (कृष्णा)

(36 %)

पाथर्डी, अहमदनगर, पारनेर, शेवगांव, राहूरी, संगमनेर (अंशत:), कोपरगांव (अंशत:), श्रीरामपूर (अंशत:), नेवासा (अंशत:), अकोले (अंशत:) (10)/ अकोले/14

10

नाशिक

15.531

12.862 (82 %)

0.550 (तापी) (4 %) 1898 (दमणगंगापार)

(12%) 0.221 (उत्तरकोकण 2 %)

चांदवड, दिंडोरी (अंशत:), सिन्नर (अंशत:), येवला (अंशत:) निफाड(अंशत:), इगतपूरी(अंशत:), नाशिक (अंशत:), (7)/त्र्यंबक, सुरगणा, दिंडोरी,इगतपूरी/15

एकूण

97.394

81.980 (84 %)

15.414

(16 %)

(36) / 105

1)

महाराष्ट्राचे भौगोलीक क्षेत्र

307.713 लक्ष हेक्टर

2)

गोदावरी खोऱ्याचे महाराष्ट्रातील भौगोलीक क्षेत्र (विदर्भ व मराठवाडा)

152.811 लक्ष हेक्टर

3)

गोदावरी खोऱ्याचे महामंडळांतर्गत भौगोलीक क्षेत्र

81.979 लक्ष हेक्टर

4)

महामंडळांतर्गत क्षेत्राची गोदावरी खोऱ्याची महाराष्ट्रातील क्षेत्राशी टक्केवारी

53.64 टक्के

5)

गोदावरी खोऱ्याचे महामंडळांतर्गत भौगोलिक क्षेत्राशी महाराष्ट्राचे भौगोलिक क्षेत्राशी टक्केवारी (3/1 X 100)

26.64 टक्के

1.3) खोऱ्याचे पाणलोट क्षेत्र व अनुज्ञेय पाणीवापर :

गोदावरी पाणीतंटा लवादाच्या निवाडयानुसार पाण्याची उपलब्धता व अनुज्ञेय पाणी वापर खालील प्रमाणे आहे.

अ.क्र.

खोरे/उपखोरे

पाणलोटक्षेत्र(लक्ष हेक्टर)

उपलब्धपाणी(दलघमी)/ (अघफू)

लवादानिर्णय दि.19/121975 नुसारअनुज्ञेयवापर(दलघमी)/ (अघफू)

1

उर्ध्वगोदावरीपैठणपर्यंत

21.756

5853.74/206.70

5853.74/206.70

2

गोदावरीनिम्नस्त्रोतपैठणतेराज्यसीमेपर्यंत(उर्वरीतगोदावरी)

31.898

4284.82/151.30

2888.64/102.00

3

पूर्णाखोरेसिध्देश्वरपर्यंत

7.770

1288.56/45.50

1288.56/45.50

4

मांजरानिजामसागरपर्यंत

10.474

1265.90/44.70

849.60/30.00

5

सुवर्णाउपखोरे

0.880

113.28/4.00

42.48/1.50

एकूण

71.898

12806.30/452.20

10923.02/385.70

1.4) एकात्मिक राज्य जल आराखडा- गोदावरी खोरे

महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण अधिनियम, 2005 या अधिनियमाच्या कलम 16 मधील तरतुदींच्या अनुषंगाने मा.मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार दि.30 नोव्हेंबर 2017 रोजी सह्याद्री अतिथी गृह, मलबार हिल, मुंबई येथे झालेल्या राज्य जल परिषदेच्या चौथ्या बैठकीत 'एकात्मिक राज्य जल आराखडा- गोदावरी खोरे' यास मान्यता प्रदान करण्यात आली.

सदर आराखड्याच्या खंड-1 मधील 10.1.9 Annexure-II नुसार जायकवाडी धरणा पर्यंत (उर्ध्व गोदावरी) खोऱ्यातील पाणीवापर खालील प्रमाणे मंजूर करण्यात आलेला आहे.

अ.क्र.

विवरण

एकूण वार्षिक पाणी वापर

दलघमी (MCM)

1)

उर्ध्व गोदावरी (जायकवाडी धरणा पर्यंत) मोठे, मध्यम व ल.पा. प्रकल्प (राज्य व स्थानिक स्तरीय) (पूर्ण झालेले व बांधकामाधीन

7477.83 MCM

(264.05 TMC)

i)

जायकवाडी धरण .. 2934.37 MCM.

ii)

ब्रम्हगव्हाण उ.सिं.यो. .. 128.29 MCM.

iii)

उर्वरित .. 4415.17 MCM

7477.83 MCM

गोदावरी पाणी तंटा लवादानुसार महाराष्ट्राला पैठण धरणा पर्यंत (जायकवाडी धरणा पर्यंत) पूर्ण पाणी वापर अनुज्ञेय आहे. गोदावरी जल आराखड्यात दर्शविल्यानुसार (पृ.क्र.483) जल विज्ञान प्रकल्प, नाशिक यांनी Vetting केल्यानुसार जायकवाडी धरणा पर्यंत पाण्याचा उपलब्ध येवा 5837 MCM (206.10 TMC) एवढा आहे. त्यानुसार सद्य:स्थितीत जायकवाडी धरणा पर्यंतचा पाणीवापर 7477.83 MCM (264.05 TMC) तलावाच्या मर्यादेपेक्षा जास्त आहे (264.05-206.10 = 57.95 TMC).

त्यामुळे 'एकात्मिक राज्य जल आराखडा गोदावरी खोरे' या मध्ये जायकवाडी धरणाच्या वर पाणी उपलब्ध नसल्याने नवीन प्रकल्प प्रस्तावित करण्यात आलेले नाही.

सदर आराखड्याच्या खंड-1 मधील 10.1.9.2 (Note on middle Godavari Basin) नुसार जायकवाडी धरणाच्या खाली तेलंगणा राज्याच्या सिमेपर्यंत (मध्य गोदावरी) गोदावरी खोऱ्यातील पाणीवापर खालील प्रमाणे मंजूर करण्यात आलेला आहे.

अ.क्र.

विवरण

75 % येव्यानुसार उपलब्ध पाणी (दलघमी )

लवादानुसार अनुज्ञेय पाणी (दलघमी )

प्रस्तावित Consumptive पाणी वापर (दलघमी )

भविष्यकालीन प्रस्तावित पाणी वापर (दलघमी )

1

2

3

4

5

6

1

मध्य गोदावरी खोरे (जायकवाडी धरणाच्या खाली तेलंगणा राज्य सिमेपर्यंत) i) उर्वरित मध्य गोदावरी, ii) दुधना उपखोरे iii) पुर्णा उपखोरे (सिध्देश्वर धरणाच्या खाली), iv) लेंडी उपखोरे, v) मानार उपखोरे, vi) सुधा उपखोरे

4391

(155.07 TMC)

2888

(102 TMC)

2168

(76.56 TMC)

720

(125.44 TMC)

गोदावरी पाणी तंटा लवादानुसार पैठण धरणाच्या खाली तेलंगणा राज्य सिमेपर्यंत एकूण 2888 दलघमी.(102 TMC) पाणी वापर अनुज्ञेय आहे. सद्य:स्थितीत प्रस्तावित Consumptive पाणी वापर 2168 दलघमी. (76.56 TMC) आहे. त्यामुळे भविष्यकालीन योजनांसाठी [2888-2168 = 720 दलघमी (25.44 TMC)] पाणी उपलब्ध असल्याचे 'एकात्मिक राज्य जल आराखडा- गोदावरी खोरे' मध्ये खंड-1 (पृ.क्र.489) वर दर्शविण्यात आलेले आहे.

1.5) महामंडळांतर्गत एकूण प्रकल्प (जून 2020 अखेर)

महामंडळांतर्गत एकूण 1296 प्रकल्प (कृष्णा खोरे व तापी खोरेसह) असून त्यापैकी सिंचन व्यवस्थापनासाठी हस्तांतरीत झालेले कृष्णा खोऱ्यातील 191 व इडकॉम कडील बंद पडलेल्या 117 उपसा सिंचन योजना वगळता गोदावरी खोऱ्यातील 988 प्रकल्प आहेत. त्याचा तपशील खालील प्रमाणे आहे.

प्रकल्पाचाप्रकार

प्रकल्पांचीसंख्या

सिंचन क्षमता (हजार हेक्टर) (वि.प्र.पुणे कडील सोडून)

पाणीसाठा (दलघमी) (2017-18)

मराठवाडा

उत्तर महाराष्ट्र

एकूण

प्रकल्पीय

निर्मित

उर्वरीत

प्रकल्पीय

निर्मित

उर्वरीत

1

2

3

4

5

6

7

8

9

10

मोठे

12

9

21

1190.337

939.025

251.312

11845.00

10377.00

1468.00

मध्यम

78

12

90

250.783

224.992

25.791

1154.86

1111.48

43.38

लघु

891

177

1068

493.029

422.361

70.668

2449.42

2217.29

232.13

एकूण

981

199

1296

(1179+117)

1934.149

1586.378

347.771

15449.28

13705.77

1743.51

वरील प्रकल्पांपैकी सन 2020-21 मध्ये बांधकामाधीन असलेल्या प्रकल्पांचा तपशील पुढील प्रमाणे आहे.

बांधकामाधीन प्रकल्प (सन 2020-21वार्षिक आखणीनुसार)

प्रकल्पाचा प्रकार

प्रकल्पांची संख्या

किंमत (रु.कोटी)

सिंचन क्षमता (हेक्टर)

पाणीसाठा (दलघमी)

अद्यावत

खर्च (03/2019 अखेर)

उर्वरीत

प्रकल्पीय

निर्मित

उर्वरीत

प्रकल्पीय

निर्मित

उर्वरीत

1

2

3

4

5

6

7

8

9

10

11

मोठे

12

34367.7200

16494.3680

17873.3520

774323

513001

254722

4550.914

3436.513

1096.151

मध्यम

7

3324.4900

1596.4100

1728.0800

74010

30319

42209

264.850

241.840

16.620

लघु

30

1862.4696

218.2064

1650.1866

22504

458

21846

163.616

3.800

154.816

एकूण

49

39554.6796

18307.9844

21251.6186

870837

543778

318777

4979.380

3682.153

1267.587

1.6) पूर्ण झालेल्या प्रकल्पांचे दायित्व (T2)

बांधकामाधीन प्रकल्पांची उर्वरीत किंमत रु. 19191.36 कोटी असून पूर्ण झालेल्या प्रकल्पांचे मार्च 2020 अखेर दायित्व रु.3570.15 कोटी आहे. (परिशिष्ट-1(ड))

2) प्रवाही वळण योजना (T2)

पश्चिम वाहिनी नद्यांद्वारे अरबी समुद्रास वाहून जाणारे पाणी अडवून प्रवाही वळण योजनाद्वारे तसेच उपसा योजनाव्दारे पूर्वे कडील गोदावरी खोऱ्यात वळविण्याबाबत खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात येत आहे. त्याकरीता एकुण 30 प्रवाही वळण योजनाव्दारे 192.09 दलघमी (6783 दलघफु), दोन उपसाजोड योजना (उपसा (3) व उपसा (4) ) व्दारे 75.09 दलघमी (2279 दलघफु) व दमणगंगा एकदरे योजनेव्दारे 143 दलघमी (5051 दलघफु) तसेच दमणगंगा,वैतरणा,गोदावरी लिंक योजनाद्वारे 202 दलघमी (7135 दलघफू) असे एकुण 612.18 दलघमी (21.62 टीएमसी) पाणी आणणेचे प्रस्तावीत आहे. त्यापैकी काही योजनांना प्र.मा मिळुन पुर्ण झालेल्या आहेत. तरी काही योजनांचे प्र.मा चे प्रस्ताव शासनास सादर झालेले आहेत. उर्वरीत योजनांचे प्रस्ताव क्षेत्रिय स्तरावर त्या फलदायी (Feasibility) आहेत किंवा कसे हे तपासणे व सर्वेक्षणाची कामे चालु आहेत.

सन 2020-21 ची आखणी

सन 2020-21 मध्ये महामंडळातर्गत बांधकामाधीन प्रकल्पांकरिता रु. 2843.3396 कोटी निधी तरतुद मंजुर आहे. सदर निधी तरतुद ही शासन अंशदान, एआयबीपी, नाबार्ड व आदिवासी ठोक तरतुद या शिर्षांखाली उपलब्ध आहे. सन 2020-21मध्ये उपलब्ध निधी तरतुदींच्या अनुषंगाने 13527 हेक्टर सिंचन क्षमता व 38.74दलघमी. पाणीसाठा निर्माण निर्मीतीचे एकूण 6 प्रकल्प पुर्ण करण्याचे नियोजन आहे. (माहिती सोबत विवरणपत्रामध्ये सादर)

केंद्र शासनाचा वेग वर्धित सिंचन लाभ कार्यक्रम (ए.आय.बी.पी.)/PMKSY

या महामंडळांतर्गत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत 4 प्रकल्प होते. या प्रकल्पांपैकी निम्न दुधना प्रकल्प, जि.परभणी, नांदुर मधमेश्वर प्रकल्प, जि. नाशिक व उर्ध्व कुंडलिका मध्यम प्रकल्प, जि. बीड या 3 प्रकल्पांची AIBP अंतर्गतची कामे भौतिक दृष्ट्यापुर्ण झालेली आहे. उर्ध्व पेनगंगा प्रकल्प जि. नांदेड या प्रकल्पाची कामे प्रगत असून नोव्हेंबर - 2021 अखेर सदर कामे पुर्ण करण्याचे नियोजन आहे

अ. क्र.

प्रकल्पाचे नाव

प्रकल्पिय

सिंचन क्षमता/पाणीसाठा

निर्मित

सिंचन क्षमता/पाणीसाठा

शेरा

1

निम्न दुधना प्रकल्प

44482 हे / 344.80 दलघमी

44482 हे / 344.80 दलघमी

भौतिक दृष्ट्या पुर्ण

2

उर्ध्व पेनगंगा प्रकल्प

107090 हे/ 1241.43 दलघमी

95774 हे/ 1241.43 दलघमी

जून 2021 अखेर पुर्ण करण्याचे नियोजन

3

उर्ध्व कुंडलीका म.प्र.

2800 हे / 18.77 दलघमी

2800 हे / 18.77 दलघमी

भौतिक दृष्ट्या पुर्ण

4

नांदूर मधमेश्वर प्रकल्प

52632 हे / 410.13 दलघमी

52632 हे / 410.13 दलघमी

भौतिक दृष्ट्या पुर्ण

उर्ध्व पेनगंगा प्रकल्पांतर्गत AIBP घटक कामांस केंद्र शासनाचे ज्ञापन दि.28/01/2020 अन्वये मार्च 2021 पर्यंत मुदतवाढ़ प्राप्त आहेत. तथापि क्षेत्रिय कार्यालयाकडून सादर केल्यानुसार सदर कामे नोव्हेंबर 2021 अखेर पुर्ण करण्याचे नियोजन आहे

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, छ.संभाजीनगरअंतर्गत केंद्र शासनाच्या अे.आय.बी.पी./ प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना (PMKSY) अंतर्गत खालील तीन मोठे व एक मध्यम प्रकल्प प्रगत आहेत.

4.1 - नांदूर मधमेश्वर टप्पा-2 : सदर प्रकल्पाचा अे.आय.बी.पी. अंतर्गत समावेश 2009-10 मधे करण्यात आला आहे. नांदूर मधमेश्वर प्रकल्पाची तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता प्राप्त किंमत रु.2210.09 कोटी आहे. नांदूर मधमेश्वर टप्पा-1 अंतर्गत मुकणे, भावली व नांदूर मधमेश्वर कालवा या घटक कामांचा समावेश होता. या घटक कामांतर्गत MOU मधील कामे पूर्ण झाली आहेत. नांदूर मधमेश्वर टप्पा-2 अंतर्गत वाकी व भाम या घटक कामांचा समावेश आहे. वाकी व भाम या धरणामध्ये पुर्ण क्षमतेने 151.22 दलघमी. पाणीसाठा निर्माण झाला असून सदर प्रकल्प भओतिक दृष्ट्या पुर्ण झाला आहे. नांदूर मधमेश्वर कालव्यावरील 20500 हेक्टर क्षेत्र सिंचन निर्मिती झालेली आहे.

4.2 - निम्न दुधना प्रकल्प : निम्न दुधना प्रकल्पास यास वर्ष 2005-06 पासुन केंद्रिय अे.आय.बी.पी. अंतर्गत अर्थसहाय्य प्राप्त होत आहे, प्रकल्पाची सुधारीत अंदाजपत्रकानुसार AIBP घटकाची किंमत रु. 1714.05 कोटी एवढी असुन, प्रकल्पांतर्गत नोव्हें. 2020 अखेर 52785 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली आहे.उर्वरित 594 हे. सिंचन क्षमता जुन 2021 पर्यंत पुर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

4.3 - उर्ध्व पेनगंगा प्रकल्प : उर्ध्व पेनगंगा हा मोठा प्रकल्प नांदेड जिल्ह्यात असुन प्रकल्पांतर्गत, ईसापुर येथे पेनगंगा नदीवर धरण ,सापळी येथे कयाधु नदीवर धरण, इसापुर उजवा कालवा, डावा कालवा, कयाधु शाखा कालवा तसेच पेनगंगानदीवर 5 उच्च पातळी बंधारे या घटकांचा प्रामुख्याने समावेश आहे. प्रकल्पाची साठवण क्षमता 1482.765 दलघमी तसेच सिंचन क्षमता 107090 हे. आहे. प्रकल्पावर अे.आय.बी.पी. पुर्वी एकूण 65100 हे. क्षेत्रावर सिंचन क्षमता निर्माण झालेली आहे. प्रकल्पांतर्गत अे.आय.बी.पी. अंतर्गत एकूण 40800 हे. क्षेत्रावर सिंचन क्षमता निर्मितीचे उद्दिष्टे होते त्यापैकी माहे 09/2020 अखेर एकुण 32080 क्षेत्रावर ख्षमाता निर्मित झाली आहे. उर्वरीत 8700 हे. क्षेत्रावर माहे नोव्हेंबर 2021 अखेर सिंचन क्षमता निर्मितीचे उद्दिष्टे आहे. केंद्र शासनाचे पत्र दि.28/01/2020 अन्वये AIBP अंतर्गत घटक कामांना माहे मार्च 2021 पर्यंत मुदतवाढ मंजूर आहे. तथापि क्षेत्रिय अधिका-यांचा अहवाकानुसार AIBP अंतर्गत घटक कामे नोव्हेंबर 2021 अखेर पुर्ण करण्याचे नियोजन आहे.उर्ध्व पेनगंगा प्रकल्पास वर्ष 2004-05 पासुन अे.आय.बी.पी. अंतर्गत केंद्रिय अर्थसहाय्य प्राप्त होत आहे, प्रकल्पातील अे.आय.बी.पी. अंतर्गत मंजुर किंमत रु.1511.83 कोटी (सन 2008-09 दरसुचीप्रमाणे) असुन मार्च 2020 अखेर झालेला खर्च रु. 1114.93 कोटी आहे. या अनुसार उर्वरीत कामाची किंमत रु. 396.90 कोटी आहे. सन 2020-21 मध्ये सदर प्रकल्पास AIBP अंतर्गत रु. 58.75 कोटी निधी प्राप्त आहे.

4.4 - उर्ध्व कुंडलीका मध्यम प्रकल्प : उर्ध्व कूंडलिका मध्यम प्रकल्प, ता. वडवणी, जि. बीड या प्रकल्पास अे.आय.बी.पी. अंतर्गत सन 2008-09 पासुन केंद्रिय अर्थसहाय्य प्राप्त होत आहे, प्रकल्पाची साठवण क्षमता 18.77 दलघमी तसेच सिंचन क्षमता 2700 हे. आहे. प्रकल्पांतर्गत मार्च 2017 अखेर 100 हे. सिंचन क्षमता निर्मिती झालेली आहे. प्रकल्पाची तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यतानुसार प्रस्तावित किंमत रु.318.99 कोटी इतकी असुन अे.आय.बी.पी. अंतर्गत घटकांची किंमत रु. 271.20 कोटी आहे. प्रकल्पाची जवळपास सर्व कामे पुर्ण झाली असून प्रकल्पातील पाणी साठा व सिंचन क्षमता निर्माण झालेली आहे. प्रकल्पाचे किमी 3 नंतर (बोगद्यानंतर) ची मुख्य कालवा व वितरण व्यवस्थेची कामे बंद नलिकेमध्ये (PDN) करण्यात आलेली आहे.

5) नाबार्ड

सन 2020-21 मध्ये महामंडळांतर्गत नार्बाडच्या ग्रामीण पायाभूत विकास निधी (NABARD) मालिकेंतर्गत उर्ध्व पेनगंगा प्रकल्पांतर्गत उ.पा.बंधा-यासाठी रु.2.25 कोटी, शं.च.वि.प्रकल्प जि.नांदेड अंतर्गत घटक कामासाठी रु.3.98 कोटी, निळवंडे-2 प्रकल्पासाठी रु. 70.00 कोटी व मांजरा प्रक्लपांतर्गत लासरा बंधारायासाठी रु. 1.00 कोटी असे एकूण रु. 77.23 कोटी निधी तरतुद मंजूर आहे.

6) निर्मित सिंचन क्षमता व प्रत्यक्ष सिंचित क्षेत्रा बाबतची माहिती

महामंडळातंर्गत प्रकल्पाद्वारे मागील तीन वर्षातील निर्मीत सिंचन क्षमता व प्रत्यक्ष सिंचीत क्षेत्राची माहिती परिशिष्ठ क्र. 5 मध्ये जोडण्यात आली आहे.

7) पाणीपट्टी वसुली बाबतची माहिती

महामंडळातंर्गत सन 2014-15 ते 2016-17 या तीन वर्षातील पाणीपट्टी वसुली बाबतची माहिती परिशिष्ठ क्र. 6 मध्ये जोडण्यात आली आहे.

9) महामंडळ स्थापने नंतर झालेल्या कामांचा संक्षिप्त आढावा
  • गोदावरी महामंडळाच्या स्थापने नंतर या महामंडळाच्या कार्यक्षेत्रामध्ये आतापर्यंत पूर्ण झालेले 348 प्रकल्पांची घळभरणी पूर्ण झाली असून 399022.40 हेक्टर एवढी अतिरिक्त सिंचन क्षमता निर्माण करण्यांत आली असून याव्दारे निर्मित झालेला पाणीसाठा 2665.09 दलघमी. एवढा आहे.
  • मोठया प्रकल्पांचे घटक असलेले विष्णुपूरी प्रकल्प (11 बंधारे), मांजरा प्रकल्प (12 बंधारे), उर्ध्व पेनगंगा प्रकल्प (किनवट, दिगडी, मोहपूर उच्च पातळी बंधारे), मांजरा प्रकल्प (होसूर, शिवणी बंधारे), बाभळी प्रकल्प (बळेगाव बंधारा), या बंधाऱ्यांमध्ये पाणीसाठा निर्माण झाला आहे.
  • कृष्णा मराठवाडा प्रकल्पांतर्गत इसरुप या योजनाची कामे पूर्ण झाली असून पाणीसाठा निर्माण झाला आहे.
  • महामंडळांतर्गत 3 मोठे (निम्न दुधना, नांदूर मधमेश्वर टप्पा-2, उर्ध्व पेनगंगा प्रकल्प) व 1 मध्यम उर्ध्व कुंडलीका प्रकल्प PMKSY अंतर्गत सन 2019-20 मध्ये प्रगतीपथावर आहेत.

10) महामंडळांतर्गत खालील मोठया प्रकल्पांच्या कामांना चालना देण्यात आली.
  • उर्ध्व प्रवरा प्रकल्प (निळवंडे-2): या प्रकल्पाचे काम सन 1994-95 मध्ये सुरु करण्यात आले आहे. सद्य:स्थितीमध्ये मुख्य धरणाचे काम पूर्ण होत असून सद्य:स्थितीत पूर्णक्षमतेने 8.32 TMC (236 दलघमी) पाणीसाठा निर्माण झाला असून कालव्याची कामे प्रगत आहेत.
  • नांदूर मधमेश्वर टप्पा-2 : सदर प्रकल्पाचा अे.आय.बी.पी. अंतर्गत समावेश 2009-10 मधे करण्यात आला आहे. नांदूर मधमेश्वर प्रकल्पाची तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता प्राप्त किंमत रु.2210.09 कोटी आहे. नांदूर मधमेश्वर टप्पा-1 अंतर्गत मुकणे, भावली व नांदूर मधमेश्वर कालवा या घटक कामांचा समावेश होता. या घटक कामांतर्गत MOU मधील कामे पूर्ण झाली आहेत. नांदूर मधमेश्वर टप्पा-2 अंतर्गत वाकी व भाम या घटक कामांचा समावेश आहे. वाकी व भाम या धरणामध्ये पुर्ण क्षमतेने 151.22 दलघमी. पाणीसाठा निर्माण झाला असून सदर प्रकल्प भओतिक दृष्ट्या पुर्ण झाला आहे.नांदूर मधमेश्वर कालव्यावरील 20500 हेक्टर क्षेत्र सिंचन निर्मिती झालेली आहे.
  • निम्न दुधना प्रकल्प : निम्न दुधना प्रकल्पास यास वर्ष 2005-06 पासुन केंद्रिय अे.आय.बी.पी. अंतर्गत अर्थसहाय्य प्राप्त होत आहे, प्रकल्पाची सुधारीत अंदाजपत्रकानुसार AIBP घटकाची किंमत रु. 1714.05 कोटी एवढी असुन, प्रकल्पांतर्गत नोव्हें. 2020 अखेर 52785 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली आहे.उर्वरित 594 हे. सिंचन क्षमता जुन 2021 पर्यंत पुर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
  • उर्ध्व पेनगंगा प्रकल्प : उर्ध्व पेनगंगा हा मोठा प्रकल्प नांदेड जिल्ह्यात असुन प्रकल्पांतर्गत, ईसापुर येथे पेनगंगा नदीवर धरण ,सापळी येथे कयाधु नदीवर धरण, इसापुर उजवा कालवा, डावा कालवा, कयाधु शाखा कालवा तसेच पेनगंगानदीवर 5 उच्च पातळी बंधारे या घटकांचा प्रामुख्याने समावेश आहे. प्रकल्पाची साठवण क्षमता 1482.765 दलघमी तसेच सिंचन क्षमता 107090 हे. आहे. प्रकल्पावर अे.आय.बी.पी. पुर्वी एकूण 65100 हे. क्षेत्रावर सिंचन क्षमता निर्माण झालेली आहे. प्रकल्पांतर्गत अे.आय.बी.पी. अंतर्गत एकूण 40800 हे. क्षेत्रावर सिंचन क्षमता निर्मितीचे उद्दिष्टे होते त्यापैकी माहे 09/2020 अखेर एकुण 32080 क्षेत्रावर ख्षमाता निर्मित झाली आहे. उर्वरीत 8700 हे. क्षेत्रावर माहे नोव्हेंबर 2021 अखेर सिंचन क्षमता निर्मितीचे उद्दिष्टे आहे. केंद्र शासनाचे पत्र दि.28/01/2020 अन्वये AIBP अंतर्गत घटक कामांना माहे मार्च 2021 पर्यंत मुदतवाढ मंजूर आहे. तथापि क्षेत्रिय अधिका-यांचा अहवाकानुसार AIBP अंतर्गत घटक कामे नोव्हेंबर 2021 अखेर पुर्ण करण्याचे नियोजन आहे.उर्ध्व पेनगंगा प्रकल्पास वर्ष 2004-05 पासुन अे.आय.बी.पी. अंतर्गत केंद्रिय अर्थसहाय्य प्राप्त होत आहे, प्रकल्पातील अे.आय.बी.पी. अंतर्गत मंजुर किंमत रु.1511.83 कोटी (सन 2008-09 दरसुचीप्रमाणे) असुन मार्च 2020 अखेर झालेला खर्च रु. 1114.93 कोटी आहे. या अनुसार उर्वरीत कामाची किंमत रु. 396.90 कोटी आहे. सन 2020-21 मध्ये सदर प्रकल्पास AIBP अंतर्गत रु. 58.75 कोटी निधी प्राप्त आहे
  • लेंडी प्रधान प्रकल्प लेंडी हा आंतरराज्यीय प्रकल्प असून या प्रकल्पांतर्गत धरणाची कामे, कालव्याची कामे व पुर्नवसनाची कामे प्रगत आहेत.
  • कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प: या प्रकल्पामूळे प्रथम टप्प्यात उस्मानाबाद जिल्हयासाठी 5.32 टीएमसी (150.66 दलघमी ) व बीड जिल्हयासाठी 1.68 टीएमसी (47.57 दलघमी ) पाणी उपलब्ध होणार आहे. या अंतर्गत विविध घटक कामे प्रगत आहेत.
  • सिंचन क्षमता निर्मिती : महामंडळ स्थापने नंतर आता पर्यंत 3.84 लक्ष हेक्टर सिंचन क्षमता निर्मिती झालेली आहे.
  • दुरुस्ती, विस्तार व सुधारणा (RRR) बाबत प्रकल्पांचा तपशील: महामंडळांतर्गत 90 योजनांना RRR अंतर्गत प्रशासकीय मान्यता मिळालेली असून ही कामे पूर्ण झाल्यावर 23128 हेक्टर क्षेत्रावर सिंचनाची पुर्नस्थापना होणार आहे.
  • लातूर पध्दतीच्या बंधाऱ्याची कामे: जुन्या को.प.बं.चे नुतनीकरण करुन लातुर पध्दतीच्या बंधाऱ्यांची कामे प्रस्तावित असलेल्या बिंदीगिहाळ, मदनसुरी, किल्लारी-2 या तीन बंधाऱ्यांचे काम पूर्ण झाले आहे. बिंदीगिहाळ लातूर पध्दतीच्या बंधाऱ्यात पाणीसाठा झालेला आहे.
  • वळण योजना: पश्चिम वाहिनी नद्यांद्वारे अरबी समुद्रास वाहून जाणारे पाणी अडवून प्रवाही वळण योजनाद्वारे तसेच उपसा योजनाव्दारे पूर्वे कडील गोदावरी खोऱ्यात वळविण्याबाबत खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात येत आहे. त्याकरीता एकुण 30 प्रवाही वळण योजनाव्दारे 192.09 दलघमी (6783 दलघफु), दोन उपसाजोड योजना (उपसा (3) व उपसा (4) ) व्दारे 75.09 दलघमी (2279 दलघफु) व दमणगंगा एकदरे योजनेव्दारे 143 दलघमी (5051 दलघफु) तसेच दमणगंगा,वैतरणा,गोदावरी लिंक योजनाद्वारे 202 दलघमी (7135 दलघफू) असे एकुण 612.18 दलघमी (21.62 टीएमसी) पाणी आणणेचे प्रस्तावीत आहे. त्यापैकी काही योजनांना प्र.मा मिळुन पुर्ण झालेल्या आहेत. तरी काही योजनांचे प्र.मा चे प्रस्ताव शासनास सादर झालेले आहेत. उर्वरीत योजनांचे प्रस्ताव क्षेत्रिय स्तरावर त्या फलदायी (Feasibility) आहेत किंवा कसे हे तपासणे व सर्वेक्षणाची कामे चालु आहेत.
  • पुनर्स्थापना कामे: जायकवाडी प्रकल्पाच्या डावा व उजव्या कालव्यावरील पुनर्स्थापनेची कामे करण्यात आलेली असून त्यामुळे पैठण डाव्या कालव्यात 1600 ऐवजी 2400 क्युसेक्स तसेच पैठण उजव्या कालव्यात 800 ऐवजी 1200 क्युसेक्स विसर्ग वहन क्षमतेत वाढ झालेली आहे.
  • तेरणा मध्यम प्रकल्प बंद पाईप लाईन व ठिंबक सिंचन: तेरणा मध्यम प्रकल्प ता.जि.उस्मानाबाद या बंद पाईप लाईन व ठिंबक सिंचनाद्वारे लाभक्षेत्रास लाभ देण्याच्या योजनेस मान्यता देण्यात आलेली असून या प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात पारंपारीक वितरण व्यवस्थेऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून बंद पाईप लाईनद्वारे व ठिबक सिंचनाद्वारे सिंचनाचा लाभ देणे प्रस्तावित आहे. यासाठीची कामे पूर्णत्वास आली असून चाचणी घेण्यात आली आहे.
  • उर्ध्व मानार मध्यम प्रकल्प: उर्ध्व मानार मध्यम प्रकल्प (प्रवाही व उपसा) या योजनेचे काम प्रगत आहे. उर्ध्व मानार उपसा सिंचन योजनेचे शिर्ष काम पूर्ण झाले आहे. प्रकल्पाचा पाणीसाठा 107.986 द.ल.घ.मी. इतका आहे व 2019 अखेर 11315 हेक्टर (धरण+उपसा) सिंचन क्षमता निर्माण झाली आहे.उपसा सिंचन योजनेचे विकेंद्रीत जलसाठा निर्मितीसह काम जून 2021 अखेर पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
  • प्रशासकीय मान्यता/सुधारीत प्रशासकीय मान्यता: महामंडळ स्थापनेनंतर आतापर्यंत 289 प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता व 346 प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता प्राप्त आहे. त्यापैकी सन 2014-15 ते नोव्हेंबर 2017 या दरम्यान 28 लघु पाटबंधारे प्रकल्प व 4 मोठया व 1 मध्यम प्रकल्पांना सुधारीत प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली असून महामंडळ स्थापनेनंतर आतापर्यंत 289 प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता व 346 प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता प्राप्त आहे.
  • सारांश :
  • गोदावरी महामंडळाच्या स्थापने नंतर या महामंडळाच्या कार्यक्षेत्रामध्ये आतापर्यंत पूर्ण झालेले 348 प्रकल्पांची घळभरणी पूर्ण झाली असून 399022.40 हेक्टर एवढी अतिरिक्त सिंचन क्षमता निर्माण करण्यांत आली असून याव्दारे निर्मित झालेला पाणीसाठा 2665.09 दलघमी. एवढा आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यामुळे अहमदनगर, नाशिक व मराठवाडयातील सिंचनाचा तसेच बिगर सिंचनाचा प्रश्न सुटण्यांस मदत झालेली आहे. सिंचनाच्या सुविधा उपलब्ध झाल्यामुळे कृषी उत्पन्नावर आधारित व्यवसाय, तसेच औद्योगिकरणास चालना मिळाली आहे. या प्रकल्पांतील पाणीसाठयातून मोठया शहरांना तसेच प्रकल्प परिसरातील लहान मोठया गावांना पिण्याच्या पाण्याचा लाभ होत आहे.
  • नाशिक प्रदेशातून समन्यायी पाणीवाटपाच्या तत्वावर जायकवाडी प्रकल्पासाठी सन 2014-15साठी 7.89 TMC, सन 2015-16 साठी 12.84 TMC,सन 2018-19 साठी 8.99TMC पाणी उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
11) निदर्शनास आणावयाच्या ठळक बाबी अ) कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प

मराठवाडयाच्या कृष्णा खोऱ्यातील भु भागास कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पाद्वारे उजनी जलाशयात येणाऱ्या 66.27 अ.घ.फु. पाण्यापैकी 21 अ.घ.फु. पैकी 19 अ.घ.फु. पाणी उस्मानाबाद जिल्हयास देण्याच्या कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या सविस्तर प्रकल्प अहवालास महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय क्र.संकीर्ण 2004/1413/(385/2004) जसंवि दि.23-8-2007 अन्वये 2382.50 कोटी रुपयास प्रशासकीय मान्यता प्रदान केलेली आहे. त्यानुसार कृष्णा - भीमा स्थिरीकरण प्रकल्पांतर्गत उजनी जलाशयात येणाऱ्या पाण्यापैकी 19.00 अ.घ.फु. पाणी उस्मानाबाद जिल्हयास देण्यासाठी कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पांतर्गत 2 स्वतंत्र उपसा सिंचन योजना द्वारे देण्याचे नियोजन करणेत आले. उपसा सिंचन योजना क्र.1 मधुन 11.00 अ.घ.फु. व उपसा सिंचन क्र.2 मधुन 8.00 अ.घ.फु. पाणी उस्मानाबाद जिल्हयातील एकूण 92,141 हेक्टर क्षेत्रास देण्याचे प्रस्तावित होते.

शासनाचे पत्र क्र. संकीर्ण 2008/417/(113/08)/जसंनि, मंत्रालय, मुंबई, दिनांक 04.11.2008 अन्वये बीड जिल्हयातील कृष्णा खोरे अंतर्गत भागासाठी उपसा सिंचन योजनांचा अंतर्भाव करुन सुधारीत प्रशासकीय मान्यता प्रस्ताव सादर करणेचे सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार शासन निर्णय क्र. कृष्णाम-0709/ (437/2009) मोप्र.-1, दिनांक 27.08.2009 अन्वये कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजना (23.66 अ.घ.फु.) जि. उस्मानाबाद व जि. बीड करिता रु. 4845.05 कोटी रकमेस प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे. सदर प्रथम सुधारीत प्रशासकीय मान्यतेनुसार कृष्णा मराठवाडा प्रकल्पाचे काम दोन टप्प्यात करावयाचे असून प्रथम टप्पा 7.00 अ.घ.फु. साठी व दुस-या टप्प्यात उर्वरीत 16.66 अ.घ.फु. साठीची कामे हाती घ्यावयाची आहेत. त्यानुसार प्रथम टप्प्यातील 7.00 अ.घ.फु. ची कामे प्रगतीपथावर आहेत.

उपसा सिंचन योजना क्र.1 : उपसा सिंचन योजना क्र.1 द्वारे उस्मानाबाद जिल्हयातील परांडा, भूम, कळंब, वाशी व उस्मानाबाद तालुक्यातील 14,936 हेक्टर सिंचनासाठी 3.08अ.घ.फु. पाणी वापर असुन उजनी धरणापासुन 5 टप्प्याद्वारे पाणी आणावयाचे प्रस्तावित आहे. उपसा सिंचन योजना क्र.1 ची कामे उपसा सिंचन योजना विभाग, उस्मानाबाद यांच्या मार्फत करण्यात येत आहे.

उपसा सिंचन योजना क्र.2 : उपसा सिंचन योजना क्र.2 द्वारे उस्मानाबाद जिल्हयातील तुळजापूर, लोहारा व उमरगा तालुक्यातील 10,862 हेक्टर क्षेत्रास 2.24 अ.घ.फु. पाण्याच्या सिंचनासाठी वापर करण्याचे प्रस्तावित आहे. उपसा सिंचन योजना क्र.2 ची कामे कृष्णा मराठवाडा बांधकाम विभाग, उस्मानाबाद यांच्या मार्फत करण्यात येत आहेत.

आष्टी उपसा सिंचन योजना क्र.3: बीड जिल्हयातील आष्टी तालुक्यातील 8,147 हेक्टर क्षेत्रास उजनी धरणातून 1.68 अ.घ.फु. पाणी देण्याचे प्रस्तावित आहे. या योजनेचे काम नांदूर मधमेश्वर कालवा विभाग क्र.2 वैजापूर मु.वाल्मी परिसर, छ.संभाजीनगरयांचेकडून प्रगतीपथावर आहेत.

कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पांतर्गत उस्मानाबाद जिल्हयातील उपसा सिंचन योजना क्र.1 व 2 साठी केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल विभाग, नवी दिल्ली यांचेकडून पत्र दि.24/06/205 अन्वये पर्यावरण मान्यता प्राप्त झाली आहे. बीड जिल्हयातील आष्टी उपसा सिंचन योजना क्र.3 साठी पर्यावरण मान्यते बाबतची कार्यवाही प्रगतीपथावर आहे.

प्रकल्पास सन 2020-21 मध्ये रू.850 कोटी अनुदान उपलब्ध असून प्रकल्पावर जाने-2021 अखेर प्रकल्पावर एकुण रू. 1039.30 कोटी खर्च झालेला आहे.

मराठवाड्यातील अवर्षण प्रवण भागास पाणी पुरविण्यासाठी अन्य उपाययोजना नसल्याने व सदर अवर्षण प्रवण भागास पाणी पुरविणे गरजेचे असल्याने प्रकल्प 4 वर्षात पूर्ण करण्याचा प्रस्ताव तयार करुन त्यास छ.संभाजीनगर येथे दि.04/10/2016 रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे.

24) भूसंपादन

सन 2019-20 मध्ये या महामंडळांतर्गत भूसंपादन कलम 11,18,28(अ) व कलम 54 साठी एकूण रु.1101.58 कोटी निधी वितरीत केलेला आहे.तसेच न्याय प्रक्रीयेत अजून प्रलंबित असलेली रक्कम (अंदाजित) ई. चे एकूण दायित्व रु.1100 कोटी आहे.

क) प्रकल्पांना सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळणे बाबत.

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाकडील एकूण 83 प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता आवश्यक आहे. त्याप्रमाणे उत्तर महाराष्ट्र प्रदेशांतर्गत असलेल्या 3 प्रकल्पांचे प्रस्ताव शासनास मान्यतेसाठी सादर करण्यात आले आहेत. एकुण 2 प्रकल्पांबाबत उपस्थित शासन शेऱ्यांचे अनुपालन करणेबाबतची कार्यवाही क्षेत्रीय स्तरावर प्रगती पथावरआहे. शासन निर्णय दि.09/09/2015 अन्वये मराठवाडयातील एकूण 80 प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता मिळण्याबाबतची कार्यवाही प्रगतीपथावर आहे. मराठवाडयातील एकूण 80 प्रकल्पांपैकी 3 प्रकल्पांची तसेच उत्तर महाराष्ट्र प्रदेशांतर्गत 2 प्रकल्पांची सुधारीत प्रशासकीय मान्यतेच्या अंदाजपत्रकाची किंमत रू.25 कोटीपेक्षा जास्त असल्यामूळे प्रकल्पांचे सुधारीत प्रशासकीय मान्यता अंदाजपत्रकाची तपासणी करणेसाठी राज्य तांत्रिक सल्लागार समितीकडे सादर करण्यात आलेले आहेत. त्यापैकी 5 प्रकल्पाबाबत उपस्थित शेऱ्यांची पूर्तता करण्याचे काम क्षेत्रीय स्तरावर प्रगतीत आहे.

ड) अवशिष्ट प्रकल्पांचे प्रलंबित दायित्व

वार्षिक आखणी 2020-21 नुसार अवशिष्ट प्रकल्पांचे एप्रिल 2020 अखेर दायित्व सुमारे रु.949 कोटी आहे. यासाठी रु.686 कोटीची मागणी करण्यात आली. तथापि सन 2020-21मध्ये रु.92 कोटी अनुदान प्राप्त आहे. सदर दायित्व अदा करुन प्रकल्पांचे पूर्णत्व अहवाल सादर करण्यास्तव भरीव अनुदान मंजूर होणे आवश्यक आहे.